Friday, October 5, 2018

अगरबत्ती ...!!!


ती...!

मला भेटली फुटपाथवरच... भिक मागत...! वय वर्षे 70 च्या आसपास... दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण...

तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा एक वास येतो...
अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी... (मळकी हा शब्द खुप थीटा आहे)

याला साडी का म्हणावं ? हाच मुळात प्रश्न आहे... अक्षरशः पाच साडेपाच फुटाचं हे   कापड ती अंगावर गुंडाळते... जे झाकायला जावं तेच उघडं पडतं... आणि दुर्दैव असं की तीला ते कळत नाही... जाणवत नाही... कारण डोळ्याच्या कसल्याशा प्राॕब्लेममुळे तीला काही दिसतच नाही...!

एकुण अवस्था अशी, की या आज्जीजवळ कुणी जावुच नये... तीच्याजवळ कुणी बसुच नये...!

तरीही मी जातो, बसतो.. तीच्याजवळ .. याचं कारण तीचं लाघवी बोलणं...

हिच्या गोब-या गालातुन एक एक शब्द असा बाहेर पडतो... जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेकपात्रातुन थेंब थेंब अभिषेक व्हावा, त्या पिंडीवर  ...!

अतिशय शुद्ध आणि सात्त्विक !

भिक मागतांना  म्हणते... बाळा तुला जमलं काही तर मला दे, स्वतःला अडचणीत टाकुन मला काही देवु नकोस... आधी तु घे, प्रसन्न हो, त्यातुन काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे... अन्यथा नको !

गोळ्या मागतांना म्हणते, डाॕक्टरसाहेब, मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या, अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खुप आहेत अजुन, त्यांना आधी द्या... मी काय करेन थोडं सहन... !

दुस-याचा विचार करण्याच्या तीच्या या वृत्तीमुळे मी हिच्याकडं आपसुकच ओढला गेलो होतो...

तीच्याजवळ बसलं की, तीचं बोलणं ऐकता ऐकता... बोलण्यातुनच  सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरुन येणाऱ्या घाण वासाची जाणिवच होत नाही आपल्याला...

शेजारी बसलं की विचारते, मी एक श्लोक म्हणु... ? आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता, ही "विश्वप्रार्थना" म्हणायला सुरुवात करते... सर्वांना चांगली बुद्धी दे... आरोग्य दे.....आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे...!

या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे...तो स्वतःला अजुन काही तरी मिळुदे म्हणुन *"लाचार"* होतोय... आणि सर्वस्व गमावुन बसलेली ही आज्जी दुस-याला सुखात ठेव म्हणुन *"प्रार्थना"* करत्येय...!

स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी... आणि दुस-यासाठी मागणं ही झाली प्रार्थना ... दोन्हीतला फरक मला या आज्जीमुळेच समजला...!

ही आज्जी, एका मॕनेजर ची बायको... भरपुर श्रीमंती आणि खानदानी संस्कार, रास्तापेठेत यांचा जुना बंगला होता... सगळं काही होतं... पण घरात  कुणी चिमुकलं नव्हतं... दोन वेळा पोटातच बाळ गेलं...मरता मरता वाचली... तिसऱ्यावेळी डाॕक्टरांनी सांगितलं... आता तुम्हाला बाळ होणे नाही... दत्तक घ्या... मधल्या काळात यजमान गेले... इतके दिवस "दुर" असलेले सगळे नातेवाईक "जवळ" आले... आठवतील ती नाती सांगुन घराची वीट न् वीट घेवुन गेले...

सगळी "नाती" बरोबर येताना "पोती"  घेवुन आली होती...

या पोत्यांतुन सर्वस्व वाहुन नेलं हिचं...हिच्याच डोळ्यादेखत...

असलेली सगळी "नाती" हिंदकाळत "गोती" खात गेली...

आणि वाड्याची ही खानदानी मालकिण आता फुटपाथची राणी म्हणुन जगत्येय... गेली 15 वर्षे...

विश्वप्रार्थना गात... सर्वांना सुखी ठेव म्हणत...!

आपल्या अंगावरही धड कापड नसतांनाही... गात असते...सर्वांना ऐश्वर्यात ठेव...!

सगळ्यांनी लुबाडुन घेतलं तरी आर्त प्रार्थना करते.... सर्वांचं भलं कर...कल्याण कर....

ऐकणारा "तो" तीचं ऐकतोय की नाही माहित नाही... तरीही गोब-या गालांतुन हसत, वर बघत विश्वासानं म्हणत असते आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे...!

मी एकदा चाचरत हिला म्हटलं, मावशी तु  मनानं इतकी सुंदर आहेस पण इतकी अस्वच्छ का राहतेस ?

ती म्हटली... अस्वच्छ ...? मी कुठंय अस्वच्छ ...???

अगं हा वास...? मी आवंढा गिळत...नजर चोरत बोललो....

ती म्हटली, हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला ?
लहान आहेस तु बाळा अजुन....
अरे रस्त्यावर या घाणेरड्या वासानंच माझ्या रक्षण केलंय माझं... ! ती हसत बोलली...!!!

म्हणजे...?

कानाजवळ येवुन बोलली...

तुला माहीत आहे ? कापुर पेटवला की आजुबाजुला किडे येत नाहीत...मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येवुन चावत नाहीत...

ही घाण नाही बाळा, हे माझं कापुर आहे... माझी अगरबत्ती आहे... या कापरामुळंच आणि अगरबत्ती मुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वा-यालाही येत नाहीत...

बापरे... मी हा विचार ऐकुन हादरलो....

केवळ शील जपण्यासाठी जाणुन बुजुन ही घाणीत राहते...

आपण कुठल्या समाजात राहतो ? *स्वतःला जपण्यासाठी इथं स्वतःला आधी घाणीत लोळवावं लागतं... दुर्गंधाला आपलं कवचकुंडल बनवावं लागतं...*

या आज्जीनं नव-यामागं स्वतःला जपण्यासाठी अंगावर घाण चढवुन घेतली होती... मुद्दाम दुर्गंधीत झाली होती.... गंमत पहा कशी... *एका घाणीनं आणि दुर्गंधानं कुणाचं तरी पावित्र्य जपलं होतं..*  *काटे बोचतात, पण फुलाला जपतात तसं...*

मी मनोमन या माऊलीला नमस्कार केला... आता अंगावरची तीच्या एक इंचाची घाण म्हणजे तीनं अंगावर चोपडुन घेतलेलं पवित्र *भस्म* आहे असं मला वाटायला लागलं.... आणि तीच्यातुन येणारा दुर्गंध म्हणजे *सुगंधी कापराचा वास...!!!*

या आजीला मी डोळ्याच्या आॕपरेशन साठी घेवुन आलो 27 तारखेला...

अंगावर तीच अर्धीमुर्धी साडी... आणि तोच वास...!

दवाखान्यात बसलेल्या इतर सगळ्यांनीच हिला पाहुन नाक मुरडलं... नाकाला पदर लावले... कुणी कुणी चक्क उठुन निघुन गेले...

बरोबरच आहे, *चिखलात फुललेलं हे कमळ* आहे, याची कुणालाच जाण नव्हती...

इतरांसाठी हा *वास* होता... आणि माझ्यासाठी *सुगंध...*

संदर्भ कसे झटक्यात बदलतात ना ?

बाळाच्या शी शु चा "आईला" कधीच "वास" येत नाही... दुर्गंधीत असुनही....

जवळचं माणुस कुणी गेल्यावर, पार्थिवाशेजारी ठेवलेल्या अगरबत्तीचा वास ही नकोसा वाटतो मग... सुगंधीत असुनही....!

वास आणि सुगंध आपल्या मनाच्या कल्पना आहेत...

समोरच्याविषयी आपली भावना महत्वाची... चांगली भावना असेल तर *सुगंधच सुगंध* नाहीतर फक्त *घाणेरडा वास...!!!*

मी आज्जीच्या अर्ध्या घातलेल्या साडीकडं  पाहीलं ...

आणि मुक नजरेनं आमच्या भुवड ताईकडं पाहिलं...

भुवड ताईने त्याच मुक्या नजरेनं भुवड बाबांकडं पाहिलं... कुणीच कुणाशी काही बोललं नाही....

बाबा उठले आणि झटक्यात बाहेर गेले... बरोबर 20 मिनिटांनी परत आले... हातात दोन साड्या, एक गाउन, मोती साबण, अंग घासण्याची घासणी आणि टाॕवेल...!

मला हेच सांगायचं होतं भुवड ताईंना... न बोलताही त्यांना कळलं....मुक्या नजराही किती बोलक्या असतात ना काहीवेळा ...?

भुवड ताईंनी मग, या माऊलीला दवाखान्यातल्याच बाथरुम मध्ये नेलं... बाळाला चोळुन घालावी तशी पावणे दोन तास आंघोळ घातली...

भुवड ताई या वेळी मला एका लेकराची माय वाटली... कुठल्याही *वासाची* लागण न झालेली...! जे आहे ते सारं *सुगंधीच* आहे असं समजुन तो *सुगंध* अनुभवणारी....

आणि ती आज्जी झाली होती एक छोटं निरागस बाळ...

बाथरुम मधुन दोघी बाहेर आल्या तेव्हा सगळ्यात जास्त *सुगंध* आला माझ्या भुवड ताईच्या हाताचा.... जगातले सर्वात सुंदर हात होते ते... आणि तितकेच सुगंधी ....!

शुचिर्भुत झालेल्या आजीचं नवं रुप पाहुन मी स्तिमित झालो...

आजीचं 27 तारखेलाच डोळ्याचं आॕपरेशनही करुन घेतलं.... आता तीला दिसायला लागेल !

आॕपरेशननंतर,मी तीचे हात हातात घेवुन म्हटलं... आज्जी... तुझ्या अंगावरचं "भस्म" आणि "कापराचा वास"  आज आम्ही काढुन टाकलाय.... तुझी ही कवचकुंडलं काढुन घेतली आहेत... पण काळजी करु नकोस... तुला आजपासुन अशा कवचकुंडलांची गरज पडणार नाही....

म्हणजे ? आज्जी बोलली....

मी म्हटलं.... आता जीथं तुला  सन्मानानं सांभाळतील अशा ठिकाणी मी तुझी व्यवस्था करणार आहे...

इथुन पुढं तु गटारीत घाणीत फुटपाथवर राहणार नाहीस... मी ठेवेन तुला चांगल्या ठिकाणी ....!

पण तु हे का करतोयस माझ्यासाठी ? तीनं निरागस पणे विचारलं....

मी ही तितक्याच निरागसतेनं सांगीतलं... तु मला सांगीतलं होतंस ना ? तुझं बाळ दोनवेळा पोटातच गेलं....
अगं ते गेलं नव्हतंच कधी.... डाॕक्टरांनी  खोटंच सांगितलं होतं  तुला... मी तेच बाळ आहे तुझं....!!!
*फिरुनी पुन्हा जन्मलो मी....!!!*

तीचे डोळे डबडबले.... माझ्या गालावरुन हात फिरवत, ती प्रसन्न हसली... म्हणाली श्लोक म्हणु...?

नेहमीसारखीच उत्तराची अपेक्षा न ठेवता... तीनं डोळे मिटले...

माझे हात हाती घेतले... ते हात तसेच हातात ठेवुन तीने स्वतःचेही  हात जोडले...

... आणि विश्वप्रार्थना सुरु केली.... माझे हात हाती घेवुन....

सर्वांना चांगली बुद्धी दे...सर्वांचं भलं कर, सर्वांना आनंदात ऐश्वर्यात, सुखात ठेव, कल्याण कर, रक्षण कर... आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे....!

मी तीच्याकडं एकटक पाहत होतो.... स्वतः जळत राहुन दुस-याला सुगंध देणारी ती एक *सुवासिक अगरबत्ती* आहे असा मला त्यावेळी भास झाला....!!!

आणि सारा आसमंत चक्कं सुगंधी झाला.....!!!

*Dr. Abhijit Sonawane*

Thursday, October 4, 2018

ज्यांना पाळी अपवित्र वाटते


ज्या पुरुषांना आणि स्त्रियांना पाळी अपवित्र वाटते, त्यांनी गर्भाशय नसणाऱ्या स्त्री शी विवाह करावा..
गर्भाशय नसणाऱ्या मुलीला सून म्हणून घरी आणावं..

काय ???
गर्भाशय नसेल
तर ती स्त्री कशी, असं म्हणताय ..??
वंशाची चिंता वाटते ??

हम्मम..

तिला गर्भाशय हवंच कारण त्यामुळेच ती सुरेख सुडौल असते, ज्यापायी तिला अनेक घाणेरड्या नजरा सहन कराव्या लागतात, (सॉरी तिला ताडायला मजा येते असं म्हणायचं होतं) तिचं दिसणं पारखून तिच्याशी लग्न केलं जातं, मग मुलं झाल्यावर ती सुटली की तिच्यावर जोक्स केले जातात, घरकी मुर्गी म्हणून गृहीत धरलं जातं.... ह्याला ती स्वतःच जबाबदार आहे.
खरं तर तिला स्वतः लाच हे कळायला हवं पाळी हेच सगळ्या दुखण्याचं मूळ कारण. काढून टाकायचं गर्भाशय....

ना रहेगी पाळी ना जन्म लेंगे विरोध करनेवाले...
बातच खतम.

का..?
बाईला स्वतःची काही इच्छा आणि मन आहे म्हणता ???
तिने स्वतःसाठी सुंदर दिसावं म्हणता, स्त्रीत्वाचा उत्सव मातृत्वाचा गौरव वगैरे ???

असं कसं ...?
दोन्ही बाजूंनी कसं बोलताय ??
एकच गोष्ट एकाचवेळी पवित्र आणि अपवित्र, महत्वाची बिनमहत्वाची कशी असू शकते ???

नक्की ठरवा बरं, एक काहीतरी...

कट्टर देवभक्त जन्मले कारण त्यांच्या आईला पाळी यायची, पाळी यायची म्ह्णून तिच्याशी त्यांच्या बाबांनी लग्न केलं, आणि म्हणून ते जन्म घेऊ शकले म्हणून पाळी पवित्र आहे म्हणायचं ..
की,
जन्म झाल्यावर, शिक्षण घेतल्यावर इतर महत्वाची अनेक कामं, विषय, मुद्दे असताना हेच देवभक्त पाळीविषयी अपप्रचार करतात, पाळी आलेल्या स्त्रीला त्रास देतात, हीन वागवतात.. म्हणजेच इथे पाळी अपवित्र आहे असं समजायचं का ?? ज्यामुळं अशी निर्बुद्ध माणसं जन्माला येतात ??

पाळीचा आणि त्यातून येणाऱ्या बाळाच्या बुद्धीचं काय लॉजिक म्हणता ???

मग पाळी येणाऱ्या बाईशी लग्न करून दर महिन्याला घर अपवित्र करण्यात काय लॉजिक आहे ??

"शेवटी काय आम्ही सोय बघणार, बुद्धी वापरणार नाही, देव कोपला तर ???

जगातल्या प्रगत देशात, बाया चार दिवस वेगळ्या बसतात, म्हणून देव त्यांना पावतो आणि म्हणून ते इतके प्रगत आहेत, हे माहिती आहे का तुम्हाला ??

मंदिरात प्रवेश मिळवून काय होणार आहे ?? आधी घरातल्यांच्या मनात आणि त्याही पेक्षा स्वतःच्या मनातली पाळी बद्दलची असहजता आणि मिथके काढून टाकायला हवियेत...

आता स्वतःचं उदाहरण देते,
मी नववी दहावीत असताना, गौरी गणपतीच्या दिवसात माझी पाळी आली, घरी सांगितलं तर मला घरीच बसावं लागेल म्हणून काही सांगितलं नाही, सगळीकडे छान बागडून आले,आरत्या केल्या, प्रसादाचं जेवले, काहीही झालं नाही.
नंतर कळलं, पाळी असताना आरती ऐकली आणि दर्शन घेतलं की आपण बहिरे आणि आंधळे होऊ, मला ऐकू येतं नीट आणि दिसतंही.

राहिला प्रश्न त्या दिवसातल्या आरामाचा तर ज्यांना तो मिळतो त्यांनी अवश्य करावा, (तेंव्हा धान्य निवडणं, भांडी घासणं लादून घेऊ नका) ज्यांना ऑफिस असतं त्यांना ही चैन हो चैनच, कितीही हाडं तुटली कमरेत दुखलं तरी कामात सूट नसते, आणि बरेचदा ती परवडत नाही, ऑफिस मध्ये काम लागतं, पवित्रता आणि देवाचा कोप हे सगळं घरी असतं.

थोडक्यात काय सोय महत्वाची असतेच पण त्यासोबतच जर माणुसकी ठेवली आणि बुद्धी वापरली तर सगळ्यांनाच जगणं सुसह्य होईल.

आणि पाळी पवित्र किंवा अपवित्र नसतेच ती फक्त नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याचा आपण उगाच बाऊ करून ठेवला आहे.

 देवदर्शनाला जाताना, बायको मुलीच्या पाळीच्या तारखा पाहून ट्रिप ठरवा, अपवित्र म्हणून नव्हे तर तिचा कम्फर्ट महत्वाचा म्हणून.

हं, झालं माझं भाषण,
आता दसरा दिवाळीत पाळी येऊ नये म्हणून बायकांनी गोळ्या घ्या, आणि घरातल्या बाईची पाळी आली तर आपल्या सणांचा फियास्को नको म्हणून घरच्यांनी आणि नवऱ्याने तिला मूक संमती द्या, सण एकदाच येतो, पाळी दर महिन्याला येते, जास्तीत जास्त काय होईल, तिला पुढे जाऊन गर्भाशयाचा त्रास, ऑपरेशन वगैरे होईल, त्यात काय होऊ दे खर्च.....
आणि जर मेलिबिलीच समजा तर मग काय, मज्जाच, दुसरी आणू....
(अशाच अर्थाचे जोक enjoy करणार्यांनी इथे हळहळू नये, मन मे लड्डू फूटा"चा आनंद घ्यावा)

#ललितासमित(Lalita kamatakar bhoyer)

Monday, November 20, 2017

पाळी

योनीतून रक्त गेलं नाही तेंव्हा......

नुकताच तिचा १२ वीचा निकाल लागला .
जेमतेम गुण न मिळवता ती नापास झाली.
पोरगी मोठी झालेली आहे
हे आईला कळलेच होते
योनीतून जाणाऱ्या रक्ताबद्दल भीतभीत का होईना
पहिल्यांदा तिने आईलाच सांगितले होते

कपड्याच्या घड्या करून , कपडा कसा लावायचा
जेणेकरून ड्रेस वर रक्ताचे डाग लागणार नाही
तो कपडा दिवसातून कितीदा बदलायचा?
हे आईनेच शिकवलेले.....

बाजूची आरती नुकतीच  मागल्या महिन्यात पळून गेली होती
तिने १२ वीतच शेण खाल्ले , असे लोक बोलत होते

ती पळून गेली म्हणून
जमाना काही ठिक नाही
असे कारण सांगून
बापानं पोरीले लग्नाच्या बजारात ऊभं केलं
रंग , तोंड, हातपाय दाखवून मात्र ती
लग्नाच्या परीक्षेत पास झाली
लग्न झालं.....

१ पाळी सासरला येईपर्यंत
सासूने तिला नवऱ्याजवळ झोपू दिलं नाही
सासूने आपल्या शंकेचे निरसण केले
ती पोटूशी नसल्याचे.....

पाळी येवून गेली.....
आता सासूने पोराला परवानगी दिली .

आजपर्यंत आईला बिलगून झोपणारी ती
कशीबरे झोपेल जरड पुरूशी अंगाखाली??
तिला भीती वाटणं साहजिकच होतं.
ती त्याला जेवढं टाळत होती
तेवढा त्याच्यातील पुरूषी अहंकार
तिच्या लसलशीत शरीरावरील उंचवट्यांना बघून उचंबळून येत होता...
त्याने पुरेपूर फायदा घेतला
समाजाने लग्न या कायद्याखाली दिलेल्या बायकोवर बलात्कार करण्याच्या मूलभूत अधिकाराचा.....

तिच्या प्रत्येक अंगाला हाता-ओठाने स्पर्श करत ,
दाताने चावत, मऊ शरीरावर ओरबाडे ओडत
शिश्न कोरडं पडेपर्यंत भोगल्यावर
तो थंड पडला.

पण पहिल्या सेक्सच्या वेळी योनीतून रक्त जात असताना
त्याने कित्तेक porn film मध्ये बघितले होते....
पण रक्त न गेल्याचे त्याने मुद्दाम लक्षपूर्वक notice केले

"रक्त गेलं नाही म्हणजे तू तुझी verginity
आधी कुठेतरी breck केली "
हा निष्कर्ष काढून त्याने तिला हाकलून लावली

बापानं बैठक भरवली
नवरा बैठकीमध्ये २०-२५ पाहून्यांत बोलून गेला
की "ती एका नवऱ्याची नाही.
तिला अजूनही कितीतरी नवरे आहेत"

बिचारीचा एवढासा लाजरा जीव काय बोलणार?
पुरावा तरी कुठला देणार , निरपराधी  असल्याचा..???

काल तिची मय्यत होती.....
पळून गेलेली आरती सुखी आहे......

✍सुधीर त्र्यें. पाटील
#सुधीरपाटील

( पोस्ट चोरण्याचा प्रयत्न करू नये. लेखनाचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.©)

चुकीचा निर्णय

जेमतेम नववीला होते. वयानं लहान असले तरी शरीरानं मात्र भरले होते. आई आता शाळेला जाताना छाती जास्त फुगून दिसायला नको , ती चालताना हलू नये म्हणून सुती कपड्याने बांधून देत होती. वरून सक्त ताकीद असायची "हळू चालायचे , उड्या मारायच्या नाहीत " वगैरे वगैरे. आता मीही ऐकून असलेली मासिक पाळी तीन दिवस बाजूला बसून अनूभवत होते.

गावठाण्यावर आमची शाळा होती. तिथल्याच एका पानपट्टीवर कपाळाला रूमाल गुंडाळलेला , तोंडात एखादी पुडी किंवा खर्रा चघळत उभा असलेला तो परंतु खूप देखना आणि डेरींगबाज . तो मला नरसिंह पिच्चर मधला सनी देओल वाटायचा. तो सतत माझ्या मागेपुढे फिरायचा. सर्व सांगत होते, तो टवाळ आहे . दारू पितो. पण मी कुणाच्याच सांगण्यावर लक्ष दिले नाही.

त्यानं माझी नजर हेरली आणि हिमतीने नववीच्या वर्षाअखेर मला एक चिठ्ठी दिली. लिहलं होतं - "आय लव यू" आणि खाली नाव होतं.

त्यानं मला चिठ्ठी दिलेली काय कसं माहित चुलत भावाला कळलं. त्याला खूप मारलं. माझ्यावरही विशेष पाळत बसली.

याचा उलट परिणाम झाला. चोरून भेटण्यात मजा येऊ लागली. माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम वाढत गेलं आणि त्यानंही माझ्या चूलत भावांच्या खून्नशीवर माझ्याशी लग्न करायचं ठरवलं. अर्थातच मी त्याला पुरेपूर साथ दिली.
पळून जाऊन लग्न केलं.

लग्न झालं इथूनच आयुष्याची राखरांगोळी झाली. खेळाच्या वयात मुलं झाली. मुलांच्या वयाबरोबर तसेच घरखर्चाबरोबर त्याचं दारूचं व्यसन वाढत गेलं ते एवढं वाढलं की त्याला कळायचे सुध्दा नाही तो घरी झोपलाय की रस्त्यावर . घरचा सर्व प्रपंच मलाच बघाव लागायचा . ब्लाऊज शिवून मिळालेल्या शंभर एक रूपयातलेही पैसे हा भांडून घेवून जायचा.

एक दिवस हद्दपार केली. त्याच्या दोन मित्रांना घेवून तो घरी आला. एरवी माझ्याकडे कुणी  बघीतलेलेही त्याला चालत नसे. आज मात्र यानं त्याच्या दोन मित्रांना व मला एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावून घेतली होती ती सकाळीच दारूची नशा उतरताच उघडली. जो नाही व्हायचा तो अतिप्रसंग माझ्यावर होऊन गेला होता. त्या दोघांनी लाल - हिरव्या नोटा त्याच्या हातात टेकवल्या.
त्यानं माझ्या उघड्या पडलेल्या अंगावर शेवटची नजर टाकली ऊंबरठ्यावरूनच पाठमोरा फिरला, दिसला तो आतल्या घरातील नाटीला लटकलेलाच. 

त्या रात्री त्या दोन मित्रांचं त्यानं टाकलेलं ओझं मी आजही अधूनमधून माझ्या उरावर पेलत असते. तेही त्याच्या भिंतीवरोल फ्रेम केलेल्या फोटोसमोर , नग्न उतानी पडून.
पश्चात्ताप करत असते, लहान वयात वाहवत जावून घेतलेल्या चूकीच्या निर्णयाचा....
आता कुठलंच स्वप्न दिसत नाही, दिसतात ते फक्त मुलांच्या पोटाला पडलेले खोल खड्डे ......
✍सुधीर त्र्यें. पाटील
#सुधीरपाटील
( NGO चालवत असणाऱ्या माझ्या मैत्रीणीने मला सांगितलेली ही एका महिलेचे दुःख. मी हे लिहावं अशी त्या महिलेनेच विनंती केली. )
( पोस्ट चोरण्याचा प्रयत्न करू नये. लेखनाचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.@ )

Sunday, November 19, 2017

वेश्याचे गांव - वाडिया

----------- -------------

        " विकास मॉडेल " म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे एक अग्रेसर राज्य. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी (फेकू व्यक्तीला मा. ही उपाधी लावणेही अयोग्य वाटते आज) जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी तेथे विकासाची मोट रोवली.त्याच विकासाचा जगभर गाजा वाजा झाला आणि हा पठ्ठया २०१४ साली भारताचा पंतप्रधान म्हणून सत्तेवर रोवला गेला.बघायला गेल तर बुडाखालचा अंधार झाकुन फक्त आभाळच दाखवने ही त्याची एक अजबच तऱ्हा.विकासाच्या नावाखाली त्याने साऱ्याच्याच डोळ्यांत धूळ फेकली.त्याने गुजरातचा विकास केला अस तुम्ही म्हंणता.त्याचे समर्थन करणारे त्याची धु धु धुता पण अरे त्याच गुजरात मध्ये 'वाडिया' नावाच्या गावात काय प्रकार चालतो हे माहित आहे का तुम्हाला......? कधी घेतलाय का तुम्ही त्या गावाचा समाचार.....? अरे हो मी तर विसरलोच तुम्ही तर मोदीने देशभर चालू केलेल्या ' फेकू ' नावाच्या उपक्रमात दंग आहात. म्हणूनच तुम्ही वाडिया सारख्या गावाशी अपिरिचित आहात.
       गुजरात पासून ३८१.४ कि.मी अंतरावर असणारे व पाकिस्तानच्या सिमेला लागून असणाऱ्या बानसकंठ जिल्ह्यामध्ये मोडनारे 'वाडिया' नावाचे  एक गांव. हे गांव वेश्याचे गांव म्हणून नावारूपास आलेले. तस म्हंटल तर या गावाची लोकसंख्या फार जास्त नाही जेमतेम ६०० च्या आसपास.पण इथल्या सर्वच घरातल्या महिला,मूली वेश्याव्यवसाय करतांना दिसतात.या गावात वेश्याव्यसाय करण्याची प्रथा ही ८० वर्षापूर्वीपासून रुजली गेलेली आहे हे निदर्शनास येते.वेश्याव्यवसाय करने हा आता त्यांचा दैनंदिन व्यवसायच झाला आहे यावरच त्यांची रोजी रोटी चालते.या गावचा इतिहास बघायला गेल तर इथे रजवाड्यांचे राज्य चालत होते.त्यात काही हौशे गौशे ही होते.राज्य करत असताना काहीतरी मनोरंजनाचे साधन असावे म्हणून तिथे एक नवी प्रथा आमलात आणली गेली.तेथील सर्वच महिलांचे सर्वच अधिकार हिसकावून घेण्यात आले व त्याच्यापासून आपले मनोरंजन व्हावे यासाठी त्यांना वेश्याचा दर्जा देवून वेश्या बनवण्यात आले. या महिलांना हळू हळू सैनिकांनाही खुश करण्यासाठी बोलवन्यात येऊ लागले. इंग्रजांच्या काळात सुरु झालेला हा देहव्यापाराचा धंदा आजगयात पिढ्यांन पिढ्यां तसाच अविरत पुढे चालू आहे.यावर आजपर्यंत कुणीही निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला नाहीये.जे चालू आहे ते तसेच चालू द्यायचे आपणही चव चाखून मोकळे व्हायचे हे अशे.
      वाडिया या गावात वयाच्या १३व्या वर्षापासूनच मुलींना या देहव्यापाराच्या आगीत ढकलले जाते.ऐकताना गलिच्छ वाटनारे हे कृत्य त्यांच्या नाशिबि १३ व्या वर्षिच येते.शिक्षणापासून वंचित.साऱ्याच अडाणी.वयाच्या १२ व्या वर्षीच काही काही मूली आई बनलेल्या दिसतात.ज्या वयात शरीरातल्या आंतरभागांची वाढ होते त्याच वेळेस त्यांना पाळन्याची दोरी हलवावी लागते. त्याच वेळेस त्यांच शरीर परपुरुषाचा बिछाना गरम करत असते अशा वेळेस तुमचे " बेटी बचाव बेटी पढाव " अस म्हणणाऱ्या संस्था कुठे जातात.शेण खायला का...?की पांगळया होऊन पडतात तेव्हा.अशा संस्थावर थूंकतो मी अन्याय,अत्याचार,बलात्कार,लैगिक शोषण कुठे झाल तर तुमच्या अंगातल रक्त सळसळुन उठत.आता उठेल का ते तसंच सळसळुन...?पेटवेन का अजुन एक न्यायाच रान....?गाजवेंन का ते माणूसकीच रणांगण....? नाही गाजवनार कारण तुम्ही षंढ होऊन लुंड मुंड झाला आहात.अंधारात तुमच ताठत पण उजेडात मात्र गोठत.
     १२ व्या वर्षी लग्नासारख्या प्रकाराला सामोरे गेल्यानंतर जीवनाची राखरांगोळीच होते.यातून बाहेर पडायच म्हंटल तर बाहेरही पडता येत नाही कारण सामोरे येते ते अडाणीपण.शिक्षणाचा गंधच लागला गेला नाही तर धड लिहताही येत नाही की वाचताही येत नाही याचाच पुरेपुर फायदा चव चाखनारा घेऊन जातो.येथील पुरुष मंडळीही वेश्याव्यवसायास हातभार लावतात.नवरा,भाऊ,मुलगा,बाप हे सगळेच दल्ल्याचे काम करतात.किती हा लाजिरवाणा प्रकार.आपली आई,बहिन,मुलगी,बायको हिला गिराईक आणून देणे हे त्याचे रोजचेच काम.नात्याला कलंक लावनारी इथली ही परंपरा. इथे मुलगी आईकडूनच शिकते धंदा करायला असच पुढच्या पिढिकडे हे गुण,परंपरा सुपुर्द केले जातात.आणि अविरत पुढे हे कृत्य तशेच चालू राहते. वेश्याव्यवसाय करणे ही कुठली आली हो परंपरा.गुजरात कोर्ट ही यास सहमती देऊन सांगते की, स्वमर्जिने हा व्यवसाय केला तर त्यात कुणीही हस्तक्षेप करु शकत नाही. वेश्याव्यसाय करने हा गुन्हा मानला जातो पण गुजरात सारख्या राज्यात याला दुजोरा दिला जातो ही खूपच दुर्देवी गोष्ट आहे.कुठलीही महिला स्वमर्जिने हा व्यवसाय करत नाही त्यामागे काहीतरी मजबूरी असतेच.कुणीतरी तिच्यावर बळजोबरी केलेली असते तिच्या मनाविरुद्ध तिच्या भावनाचा छळ केलेला असतो.तिच्या गोजिरवान्या शरीराचा वासनी लिंगपिसाटाने लचका तोडलेला असतो.तरीही शासन याकडे लक्ष देत नाही.आंधळयाची भूमिका घेऊन तेहि कोपऱ्यात पडलेले दिसते.
    इथेले वातावरण म्हणजे खूपच भयानक.अंगावर शहारे येन्यासारखा इथला हा प्रकार.आजुबाजुच्या परिसरातून तशेच शहरातून बडे बडे असामी येऊन वाडीयातल्या वेश्याशी रात रात घालवून जातात.तिथल्या त्या कोमल शरीरावर राजरोस बलात्कार होतो आणि याची कुठेही वाच्यता होत नाही.कुणीच याची दखल घेत नाही. सगळेच हे वेश्याचे गांव बघून गांडीत बोट घालून बसतात.कारण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्या बालिश बालीकांची तेथून सुटका करून देण्यासाठी आमची हातभर फाटत असते तेव्हा.तो फेकू मन की बात सांगत बोंबलत असतो पण त्यांच्याच राज्यात हा वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडपणे सर्रास चालतो याची कुठे तो हु की चु ही करताना दिसत नाही.त्यांना तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करत नाही.त्याने गुजरातचा विकास केला मग या वाडिया सारख्या गावाचा का विकास केला नाही हाच प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कविला पडून राहतो.अहो त्याने तर तुमची  "भाईयो और बहिनो" म्हणून म्हणूनच पार खालूंन वरुन मारली आहे हो.असो.तो राहिला राजकरणाचा मुद्दा.
   वाडियामध्ये चालणाऱ्या या व्यवसायावर येईल का भविष्यात बंदी...?कुणी उचलेल का या विरोधात पाऊल...?वेश्याचे एक दोन घर असते तर ठीक आहे ना पण पूर्णच्या पूर्णच गांव वेश्याव्यसाय करते हे अजबच आहे. ' वेश्याचे गांव - वाडिया ' म्हणून आज ते संपूर्ण जगभर प्रचलित आहे पण त्यावर मज्जाव करण्यास कुणीही जिवंत नाहीये.आता तिथल्या महिलांनाही परपुरुषासोबत सेक्स करण्याची सवय झाली आहे.त्यामुळे त्याही तसंच जीवन जगताना आढळुन येतात.आज जगातल्या मूली उच्च शिक्षण घेऊन उच्च पदांवर कार्य करताना दिसतात आणि वाडिया मधल्या मुली पुरुषांची हौस पूर्ण करताना दिसतात.शरमेने मान झुकून जावी अस हे वाडियातल सत्य.
बाई म्हणून मी जन्माला आले
पण बाई म्हणून मला जगताच आले नाही
रांड म्हणूनच मी समाजात जगवले गेले
आणि रांड म्हणूनच सरनावर चढले गेले
षंढ होऊन तुम्ही तुमचे लंड ठंड केले
पण बंड मात्र कुणीच नाही पुकारले.
___ विद्रोही कवि /लेखक बुद्धभूषण साळवे_____
         नाशिक - ७०४००३४४६०

Thursday, November 16, 2017

परवा परवा बायकोची तब्येत नव्हती बरी...

 छान कविता 
परवा परवा बायकोची
तब्येत नव्हती बरी,
सर्दी, खोकला, तापाने
फणफणली बिचारी...

मी म्हणालो आराम कर
मी कामाच बघुन घेईन,
एक दिवस का होईना
तुझ आयुष्य जगुन घेईन !

थंड पाण्याचा पट्ट्या
डोक्यावर तिच्या ठेवत होतो,
थोडा थोडा बाम
डोक्याला तिच्या लावत होतो !

स्वयंपाकाची वाटल
करावी आता तयारी ,
बायको अंथरूणावरून
पहात होती सारी...

कणीक भिजवतांना
पडल बरच पाणी,
पातेल्यात भाजीची
करपुन गेली फोडणी !

करपलेल्या पोळ्यामध्ये
बरेच होते नकाशे,
बायको सार पाहून
गालातल्या गालात हसे !

एका दिवसाच्या स्वयंपाकाने
उडाली माझी तारांबळ,
कुठून मिळत असेल बर
स्त्रियांना एवढ बळ !

जेवण घेतल वाढुन
बायको म्हणाली छान झालं,
तिच माझ्यावरच प्रेम पाहून
मन माझ भरुन आलं !

खारट तिखट भाजीसुद्धा
ती आनंदात जेवली,
जळालेल्या पोळ्यावर तिने,
 मनातून माया लावली !

किती नाव ठेवतो आपण
तिने केलेल्या स्वयंपाकाला,
काय वाटत असेल बर
खरच तिच्या मनाला !

तीचा चवदार स्वयंपाक
अजुन चवदार लागतो,
आजारी पडली तेंव्हापासुन
मी शहाण्यासारखा वागतो !

*"समस्त पत्नीवर्गासाठी"*
https://ravindrajavanjal1968.wordpress.com

कळलच नाहीवर्गातल्या मुली कुठं गेल्या....

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या....
संगी, मंगी, कपी, मंदी
हसायच्या फिंदी फिंदी
आणखीही बऱ्याच होत्या वर्गात
कळायचंच नाही
आम्ही वर्गात आहे कि स्वर्गात....


खेळायच्या बडबडायच्या,
बागडायच्या,नाचायच्या
म्हणलं तर खूप अल्लड होत्या
त्या फ्रॉक, पोलके,
चापून चोपून घातलेल्या वेण्यासकट
त्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या ....

कळलचं नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या.
आम्ही शेण पाणी आणायचो
त्या वर्ग सारवायच्या
शाळा सुटल्यावर
वर्गही त्याच अवरायाच्या
आम्ही वर्ग झाडायचो,
त्या बस्करं घालायच्या
आम्ही पटांगण झाडायचो,
त्या सडा मारायच्या...

त्या लंगडी लंगडी,
झिम्माड फुगडी घालायच्या,
सर्वांशीच मनमोकळं बोलायच्या..
अभ्यास मात्र मन लाऊन करायच्या
कवितेत तर खूप खूप रमायच्या
सातवी पर्यंत गावातल्या गावात
त्या आमच्या बरोबर शिकल्या ......

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या
सातवी नंतर घरात
असा काही नियम नव्हता
बाहेर गावी मुलींना
कोणीच पाठवत नव्हता
शाळा सुटली पाटी फुटली
मुली बसल्या घरात
आम्ही दिवटे चिरंजीव
शिकत राहिलो शहरात
अल्पवयातच त्या बोहल्यावर चढल्या ....

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या ...
मिसुरड फुटायचा आतच
आम्ही मामा झालो, काका झालो
त्या आई झाल्या,मावशी झाल्या
काकू झाल्या, सून झाल्या ,
नणंद झाल्या, भावजयी झाल्या
विहिरीवर पाण्याला गेल्या
रानात गेल्या, वनात गेल्या
काही स्टोव्हवर गेल्या,
काही शेगडीवर गेल्या,
काही परत आल्याच नाही
काही परतल्या
पण पार करपल्या
जळालेल्या भकारीसारख्या
व्यवस्थेच्या चारकात पिळल्या गेल्या ......

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या..
त्या सावित्री होत्या
त्यांना एकही फुले भेटला नाही
त्या जिजाऊ होत्या
पण एकही शहाजी भेटला नाही
त्या कस्तुरबा होत्या
एकही गांधी भेटला नाही
कुणी म्हणत
त्या परक्याचं धन झाल्या
कुणी म्हणत,
निर्माल्य होऊन जीवन गंगेत
वाहून गेल्या ....

मला वाटत
त्या नवीन प्रकारे सती गेल्या..
काही असो
त्या आता दिसेनाशा झाल्या .....
कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या.....