Monday, November 20, 2017

पाळी

योनीतून रक्त गेलं नाही तेंव्हा......

नुकताच तिचा १२ वीचा निकाल लागला .
जेमतेम गुण न मिळवता ती नापास झाली.
पोरगी मोठी झालेली आहे
हे आईला कळलेच होते
योनीतून जाणाऱ्या रक्ताबद्दल भीतभीत का होईना
पहिल्यांदा तिने आईलाच सांगितले होते

कपड्याच्या घड्या करून , कपडा कसा लावायचा
जेणेकरून ड्रेस वर रक्ताचे डाग लागणार नाही
तो कपडा दिवसातून कितीदा बदलायचा?
हे आईनेच शिकवलेले.....

बाजूची आरती नुकतीच  मागल्या महिन्यात पळून गेली होती
तिने १२ वीतच शेण खाल्ले , असे लोक बोलत होते

ती पळून गेली म्हणून
जमाना काही ठिक नाही
असे कारण सांगून
बापानं पोरीले लग्नाच्या बजारात ऊभं केलं
रंग , तोंड, हातपाय दाखवून मात्र ती
लग्नाच्या परीक्षेत पास झाली
लग्न झालं.....

१ पाळी सासरला येईपर्यंत
सासूने तिला नवऱ्याजवळ झोपू दिलं नाही
सासूने आपल्या शंकेचे निरसण केले
ती पोटूशी नसल्याचे.....

पाळी येवून गेली.....
आता सासूने पोराला परवानगी दिली .

आजपर्यंत आईला बिलगून झोपणारी ती
कशीबरे झोपेल जरड पुरूशी अंगाखाली??
तिला भीती वाटणं साहजिकच होतं.
ती त्याला जेवढं टाळत होती
तेवढा त्याच्यातील पुरूषी अहंकार
तिच्या लसलशीत शरीरावरील उंचवट्यांना बघून उचंबळून येत होता...
त्याने पुरेपूर फायदा घेतला
समाजाने लग्न या कायद्याखाली दिलेल्या बायकोवर बलात्कार करण्याच्या मूलभूत अधिकाराचा.....

तिच्या प्रत्येक अंगाला हाता-ओठाने स्पर्श करत ,
दाताने चावत, मऊ शरीरावर ओरबाडे ओडत
शिश्न कोरडं पडेपर्यंत भोगल्यावर
तो थंड पडला.

पण पहिल्या सेक्सच्या वेळी योनीतून रक्त जात असताना
त्याने कित्तेक porn film मध्ये बघितले होते....
पण रक्त न गेल्याचे त्याने मुद्दाम लक्षपूर्वक notice केले

"रक्त गेलं नाही म्हणजे तू तुझी verginity
आधी कुठेतरी breck केली "
हा निष्कर्ष काढून त्याने तिला हाकलून लावली

बापानं बैठक भरवली
नवरा बैठकीमध्ये २०-२५ पाहून्यांत बोलून गेला
की "ती एका नवऱ्याची नाही.
तिला अजूनही कितीतरी नवरे आहेत"

बिचारीचा एवढासा लाजरा जीव काय बोलणार?
पुरावा तरी कुठला देणार , निरपराधी  असल्याचा..???

काल तिची मय्यत होती.....
पळून गेलेली आरती सुखी आहे......

✍सुधीर त्र्यें. पाटील
#सुधीरपाटील

( पोस्ट चोरण्याचा प्रयत्न करू नये. लेखनाचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.©)

चुकीचा निर्णय

जेमतेम नववीला होते. वयानं लहान असले तरी शरीरानं मात्र भरले होते. आई आता शाळेला जाताना छाती जास्त फुगून दिसायला नको , ती चालताना हलू नये म्हणून सुती कपड्याने बांधून देत होती. वरून सक्त ताकीद असायची "हळू चालायचे , उड्या मारायच्या नाहीत " वगैरे वगैरे. आता मीही ऐकून असलेली मासिक पाळी तीन दिवस बाजूला बसून अनूभवत होते.

गावठाण्यावर आमची शाळा होती. तिथल्याच एका पानपट्टीवर कपाळाला रूमाल गुंडाळलेला , तोंडात एखादी पुडी किंवा खर्रा चघळत उभा असलेला तो परंतु खूप देखना आणि डेरींगबाज . तो मला नरसिंह पिच्चर मधला सनी देओल वाटायचा. तो सतत माझ्या मागेपुढे फिरायचा. सर्व सांगत होते, तो टवाळ आहे . दारू पितो. पण मी कुणाच्याच सांगण्यावर लक्ष दिले नाही.

त्यानं माझी नजर हेरली आणि हिमतीने नववीच्या वर्षाअखेर मला एक चिठ्ठी दिली. लिहलं होतं - "आय लव यू" आणि खाली नाव होतं.

त्यानं मला चिठ्ठी दिलेली काय कसं माहित चुलत भावाला कळलं. त्याला खूप मारलं. माझ्यावरही विशेष पाळत बसली.

याचा उलट परिणाम झाला. चोरून भेटण्यात मजा येऊ लागली. माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम वाढत गेलं आणि त्यानंही माझ्या चूलत भावांच्या खून्नशीवर माझ्याशी लग्न करायचं ठरवलं. अर्थातच मी त्याला पुरेपूर साथ दिली.
पळून जाऊन लग्न केलं.

लग्न झालं इथूनच आयुष्याची राखरांगोळी झाली. खेळाच्या वयात मुलं झाली. मुलांच्या वयाबरोबर तसेच घरखर्चाबरोबर त्याचं दारूचं व्यसन वाढत गेलं ते एवढं वाढलं की त्याला कळायचे सुध्दा नाही तो घरी झोपलाय की रस्त्यावर . घरचा सर्व प्रपंच मलाच बघाव लागायचा . ब्लाऊज शिवून मिळालेल्या शंभर एक रूपयातलेही पैसे हा भांडून घेवून जायचा.

एक दिवस हद्दपार केली. त्याच्या दोन मित्रांना घेवून तो घरी आला. एरवी माझ्याकडे कुणी  बघीतलेलेही त्याला चालत नसे. आज मात्र यानं त्याच्या दोन मित्रांना व मला एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावून घेतली होती ती सकाळीच दारूची नशा उतरताच उघडली. जो नाही व्हायचा तो अतिप्रसंग माझ्यावर होऊन गेला होता. त्या दोघांनी लाल - हिरव्या नोटा त्याच्या हातात टेकवल्या.
त्यानं माझ्या उघड्या पडलेल्या अंगावर शेवटची नजर टाकली ऊंबरठ्यावरूनच पाठमोरा फिरला, दिसला तो आतल्या घरातील नाटीला लटकलेलाच. 

त्या रात्री त्या दोन मित्रांचं त्यानं टाकलेलं ओझं मी आजही अधूनमधून माझ्या उरावर पेलत असते. तेही त्याच्या भिंतीवरोल फ्रेम केलेल्या फोटोसमोर , नग्न उतानी पडून.
पश्चात्ताप करत असते, लहान वयात वाहवत जावून घेतलेल्या चूकीच्या निर्णयाचा....
आता कुठलंच स्वप्न दिसत नाही, दिसतात ते फक्त मुलांच्या पोटाला पडलेले खोल खड्डे ......
✍सुधीर त्र्यें. पाटील
#सुधीरपाटील
( NGO चालवत असणाऱ्या माझ्या मैत्रीणीने मला सांगितलेली ही एका महिलेचे दुःख. मी हे लिहावं अशी त्या महिलेनेच विनंती केली. )
( पोस्ट चोरण्याचा प्रयत्न करू नये. लेखनाचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.@ )

Sunday, November 19, 2017

वेश्याचे गांव - वाडिया

----------- -------------

        " विकास मॉडेल " म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे एक अग्रेसर राज्य. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी (फेकू व्यक्तीला मा. ही उपाधी लावणेही अयोग्य वाटते आज) जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी तेथे विकासाची मोट रोवली.त्याच विकासाचा जगभर गाजा वाजा झाला आणि हा पठ्ठया २०१४ साली भारताचा पंतप्रधान म्हणून सत्तेवर रोवला गेला.बघायला गेल तर बुडाखालचा अंधार झाकुन फक्त आभाळच दाखवने ही त्याची एक अजबच तऱ्हा.विकासाच्या नावाखाली त्याने साऱ्याच्याच डोळ्यांत धूळ फेकली.त्याने गुजरातचा विकास केला अस तुम्ही म्हंणता.त्याचे समर्थन करणारे त्याची धु धु धुता पण अरे त्याच गुजरात मध्ये 'वाडिया' नावाच्या गावात काय प्रकार चालतो हे माहित आहे का तुम्हाला......? कधी घेतलाय का तुम्ही त्या गावाचा समाचार.....? अरे हो मी तर विसरलोच तुम्ही तर मोदीने देशभर चालू केलेल्या ' फेकू ' नावाच्या उपक्रमात दंग आहात. म्हणूनच तुम्ही वाडिया सारख्या गावाशी अपिरिचित आहात.
       गुजरात पासून ३८१.४ कि.मी अंतरावर असणारे व पाकिस्तानच्या सिमेला लागून असणाऱ्या बानसकंठ जिल्ह्यामध्ये मोडनारे 'वाडिया' नावाचे  एक गांव. हे गांव वेश्याचे गांव म्हणून नावारूपास आलेले. तस म्हंटल तर या गावाची लोकसंख्या फार जास्त नाही जेमतेम ६०० च्या आसपास.पण इथल्या सर्वच घरातल्या महिला,मूली वेश्याव्यवसाय करतांना दिसतात.या गावात वेश्याव्यसाय करण्याची प्रथा ही ८० वर्षापूर्वीपासून रुजली गेलेली आहे हे निदर्शनास येते.वेश्याव्यवसाय करने हा आता त्यांचा दैनंदिन व्यवसायच झाला आहे यावरच त्यांची रोजी रोटी चालते.या गावचा इतिहास बघायला गेल तर इथे रजवाड्यांचे राज्य चालत होते.त्यात काही हौशे गौशे ही होते.राज्य करत असताना काहीतरी मनोरंजनाचे साधन असावे म्हणून तिथे एक नवी प्रथा आमलात आणली गेली.तेथील सर्वच महिलांचे सर्वच अधिकार हिसकावून घेण्यात आले व त्याच्यापासून आपले मनोरंजन व्हावे यासाठी त्यांना वेश्याचा दर्जा देवून वेश्या बनवण्यात आले. या महिलांना हळू हळू सैनिकांनाही खुश करण्यासाठी बोलवन्यात येऊ लागले. इंग्रजांच्या काळात सुरु झालेला हा देहव्यापाराचा धंदा आजगयात पिढ्यांन पिढ्यां तसाच अविरत पुढे चालू आहे.यावर आजपर्यंत कुणीही निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला नाहीये.जे चालू आहे ते तसेच चालू द्यायचे आपणही चव चाखून मोकळे व्हायचे हे अशे.
      वाडिया या गावात वयाच्या १३व्या वर्षापासूनच मुलींना या देहव्यापाराच्या आगीत ढकलले जाते.ऐकताना गलिच्छ वाटनारे हे कृत्य त्यांच्या नाशिबि १३ व्या वर्षिच येते.शिक्षणापासून वंचित.साऱ्याच अडाणी.वयाच्या १२ व्या वर्षीच काही काही मूली आई बनलेल्या दिसतात.ज्या वयात शरीरातल्या आंतरभागांची वाढ होते त्याच वेळेस त्यांना पाळन्याची दोरी हलवावी लागते. त्याच वेळेस त्यांच शरीर परपुरुषाचा बिछाना गरम करत असते अशा वेळेस तुमचे " बेटी बचाव बेटी पढाव " अस म्हणणाऱ्या संस्था कुठे जातात.शेण खायला का...?की पांगळया होऊन पडतात तेव्हा.अशा संस्थावर थूंकतो मी अन्याय,अत्याचार,बलात्कार,लैगिक शोषण कुठे झाल तर तुमच्या अंगातल रक्त सळसळुन उठत.आता उठेल का ते तसंच सळसळुन...?पेटवेन का अजुन एक न्यायाच रान....?गाजवेंन का ते माणूसकीच रणांगण....? नाही गाजवनार कारण तुम्ही षंढ होऊन लुंड मुंड झाला आहात.अंधारात तुमच ताठत पण उजेडात मात्र गोठत.
     १२ व्या वर्षी लग्नासारख्या प्रकाराला सामोरे गेल्यानंतर जीवनाची राखरांगोळीच होते.यातून बाहेर पडायच म्हंटल तर बाहेरही पडता येत नाही कारण सामोरे येते ते अडाणीपण.शिक्षणाचा गंधच लागला गेला नाही तर धड लिहताही येत नाही की वाचताही येत नाही याचाच पुरेपुर फायदा चव चाखनारा घेऊन जातो.येथील पुरुष मंडळीही वेश्याव्यवसायास हातभार लावतात.नवरा,भाऊ,मुलगा,बाप हे सगळेच दल्ल्याचे काम करतात.किती हा लाजिरवाणा प्रकार.आपली आई,बहिन,मुलगी,बायको हिला गिराईक आणून देणे हे त्याचे रोजचेच काम.नात्याला कलंक लावनारी इथली ही परंपरा. इथे मुलगी आईकडूनच शिकते धंदा करायला असच पुढच्या पिढिकडे हे गुण,परंपरा सुपुर्द केले जातात.आणि अविरत पुढे हे कृत्य तशेच चालू राहते. वेश्याव्यवसाय करणे ही कुठली आली हो परंपरा.गुजरात कोर्ट ही यास सहमती देऊन सांगते की, स्वमर्जिने हा व्यवसाय केला तर त्यात कुणीही हस्तक्षेप करु शकत नाही. वेश्याव्यसाय करने हा गुन्हा मानला जातो पण गुजरात सारख्या राज्यात याला दुजोरा दिला जातो ही खूपच दुर्देवी गोष्ट आहे.कुठलीही महिला स्वमर्जिने हा व्यवसाय करत नाही त्यामागे काहीतरी मजबूरी असतेच.कुणीतरी तिच्यावर बळजोबरी केलेली असते तिच्या मनाविरुद्ध तिच्या भावनाचा छळ केलेला असतो.तिच्या गोजिरवान्या शरीराचा वासनी लिंगपिसाटाने लचका तोडलेला असतो.तरीही शासन याकडे लक्ष देत नाही.आंधळयाची भूमिका घेऊन तेहि कोपऱ्यात पडलेले दिसते.
    इथेले वातावरण म्हणजे खूपच भयानक.अंगावर शहारे येन्यासारखा इथला हा प्रकार.आजुबाजुच्या परिसरातून तशेच शहरातून बडे बडे असामी येऊन वाडीयातल्या वेश्याशी रात रात घालवून जातात.तिथल्या त्या कोमल शरीरावर राजरोस बलात्कार होतो आणि याची कुठेही वाच्यता होत नाही.कुणीच याची दखल घेत नाही. सगळेच हे वेश्याचे गांव बघून गांडीत बोट घालून बसतात.कारण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्या बालिश बालीकांची तेथून सुटका करून देण्यासाठी आमची हातभर फाटत असते तेव्हा.तो फेकू मन की बात सांगत बोंबलत असतो पण त्यांच्याच राज्यात हा वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडपणे सर्रास चालतो याची कुठे तो हु की चु ही करताना दिसत नाही.त्यांना तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करत नाही.त्याने गुजरातचा विकास केला मग या वाडिया सारख्या गावाचा का विकास केला नाही हाच प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कविला पडून राहतो.अहो त्याने तर तुमची  "भाईयो और बहिनो" म्हणून म्हणूनच पार खालूंन वरुन मारली आहे हो.असो.तो राहिला राजकरणाचा मुद्दा.
   वाडियामध्ये चालणाऱ्या या व्यवसायावर येईल का भविष्यात बंदी...?कुणी उचलेल का या विरोधात पाऊल...?वेश्याचे एक दोन घर असते तर ठीक आहे ना पण पूर्णच्या पूर्णच गांव वेश्याव्यसाय करते हे अजबच आहे. ' वेश्याचे गांव - वाडिया ' म्हणून आज ते संपूर्ण जगभर प्रचलित आहे पण त्यावर मज्जाव करण्यास कुणीही जिवंत नाहीये.आता तिथल्या महिलांनाही परपुरुषासोबत सेक्स करण्याची सवय झाली आहे.त्यामुळे त्याही तसंच जीवन जगताना आढळुन येतात.आज जगातल्या मूली उच्च शिक्षण घेऊन उच्च पदांवर कार्य करताना दिसतात आणि वाडिया मधल्या मुली पुरुषांची हौस पूर्ण करताना दिसतात.शरमेने मान झुकून जावी अस हे वाडियातल सत्य.
बाई म्हणून मी जन्माला आले
पण बाई म्हणून मला जगताच आले नाही
रांड म्हणूनच मी समाजात जगवले गेले
आणि रांड म्हणूनच सरनावर चढले गेले
षंढ होऊन तुम्ही तुमचे लंड ठंड केले
पण बंड मात्र कुणीच नाही पुकारले.
___ विद्रोही कवि /लेखक बुद्धभूषण साळवे_____
         नाशिक - ७०४००३४४६०

Thursday, November 16, 2017

परवा परवा बायकोची तब्येत नव्हती बरी...

 छान कविता 
परवा परवा बायकोची
तब्येत नव्हती बरी,
सर्दी, खोकला, तापाने
फणफणली बिचारी...

मी म्हणालो आराम कर
मी कामाच बघुन घेईन,
एक दिवस का होईना
तुझ आयुष्य जगुन घेईन !

थंड पाण्याचा पट्ट्या
डोक्यावर तिच्या ठेवत होतो,
थोडा थोडा बाम
डोक्याला तिच्या लावत होतो !

स्वयंपाकाची वाटल
करावी आता तयारी ,
बायको अंथरूणावरून
पहात होती सारी...

कणीक भिजवतांना
पडल बरच पाणी,
पातेल्यात भाजीची
करपुन गेली फोडणी !

करपलेल्या पोळ्यामध्ये
बरेच होते नकाशे,
बायको सार पाहून
गालातल्या गालात हसे !

एका दिवसाच्या स्वयंपाकाने
उडाली माझी तारांबळ,
कुठून मिळत असेल बर
स्त्रियांना एवढ बळ !

जेवण घेतल वाढुन
बायको म्हणाली छान झालं,
तिच माझ्यावरच प्रेम पाहून
मन माझ भरुन आलं !

खारट तिखट भाजीसुद्धा
ती आनंदात जेवली,
जळालेल्या पोळ्यावर तिने,
 मनातून माया लावली !

किती नाव ठेवतो आपण
तिने केलेल्या स्वयंपाकाला,
काय वाटत असेल बर
खरच तिच्या मनाला !

तीचा चवदार स्वयंपाक
अजुन चवदार लागतो,
आजारी पडली तेंव्हापासुन
मी शहाण्यासारखा वागतो !

*"समस्त पत्नीवर्गासाठी"*
https://ravindrajavanjal1968.wordpress.com

कळलच नाहीवर्गातल्या मुली कुठं गेल्या....

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या....
संगी, मंगी, कपी, मंदी
हसायच्या फिंदी फिंदी
आणखीही बऱ्याच होत्या वर्गात
कळायचंच नाही
आम्ही वर्गात आहे कि स्वर्गात....


खेळायच्या बडबडायच्या,
बागडायच्या,नाचायच्या
म्हणलं तर खूप अल्लड होत्या
त्या फ्रॉक, पोलके,
चापून चोपून घातलेल्या वेण्यासकट
त्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या ....

कळलचं नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या.
आम्ही शेण पाणी आणायचो
त्या वर्ग सारवायच्या
शाळा सुटल्यावर
वर्गही त्याच अवरायाच्या
आम्ही वर्ग झाडायचो,
त्या बस्करं घालायच्या
आम्ही पटांगण झाडायचो,
त्या सडा मारायच्या...

त्या लंगडी लंगडी,
झिम्माड फुगडी घालायच्या,
सर्वांशीच मनमोकळं बोलायच्या..
अभ्यास मात्र मन लाऊन करायच्या
कवितेत तर खूप खूप रमायच्या
सातवी पर्यंत गावातल्या गावात
त्या आमच्या बरोबर शिकल्या ......

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या
सातवी नंतर घरात
असा काही नियम नव्हता
बाहेर गावी मुलींना
कोणीच पाठवत नव्हता
शाळा सुटली पाटी फुटली
मुली बसल्या घरात
आम्ही दिवटे चिरंजीव
शिकत राहिलो शहरात
अल्पवयातच त्या बोहल्यावर चढल्या ....

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या ...
मिसुरड फुटायचा आतच
आम्ही मामा झालो, काका झालो
त्या आई झाल्या,मावशी झाल्या
काकू झाल्या, सून झाल्या ,
नणंद झाल्या, भावजयी झाल्या
विहिरीवर पाण्याला गेल्या
रानात गेल्या, वनात गेल्या
काही स्टोव्हवर गेल्या,
काही शेगडीवर गेल्या,
काही परत आल्याच नाही
काही परतल्या
पण पार करपल्या
जळालेल्या भकारीसारख्या
व्यवस्थेच्या चारकात पिळल्या गेल्या ......

कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या..
त्या सावित्री होत्या
त्यांना एकही फुले भेटला नाही
त्या जिजाऊ होत्या
पण एकही शहाजी भेटला नाही
त्या कस्तुरबा होत्या
एकही गांधी भेटला नाही
कुणी म्हणत
त्या परक्याचं धन झाल्या
कुणी म्हणत,
निर्माल्य होऊन जीवन गंगेत
वाहून गेल्या ....

मला वाटत
त्या नवीन प्रकारे सती गेल्या..
काही असो
त्या आता दिसेनाशा झाल्या .....
कळलच नाही
वर्गातल्या मुली कुठं गेल्या.....

इ-साहित्य

एक लिंक आहे

http://www.esahity.com

या वेबसाईटवर कुठेही बिनधास्त क्लिक करा. मोकळ्या मनाने फ़ेरफ़टका मारा. फ़्री आणि ईझी. बेसुमार मराठी पुस्तकं वाचा.
उत्तम दर्जेदार पुस्तकं. कोणताही विषय घ्या. कितीही वाचा. कुठेही पैशाची मागणी नाही. जाहिराती नाहीत. भलत्यासलत्या हायटेक लिंक्स नाहीत, व्हायरस नाही. ब्रेक्स नाहीत. तुम्ही जर खरे मराठी वाचनाचे भक्त असाल तर याहून मोठा सुखाचा खजिना तुम्हाला इतक्या सहजपणे कुठेही मिळणार नाही.

मराठी पुस्तक प्रेमिकांसाठी आहे हे. 👌

Monday, November 13, 2017

जगण्याचं सूत्र चुकतंय का?​ 


         भाऊ काय बहीण काय 

         नुसता फापट पसारा,  

         कोण कोणाला विचारतंय 

         कुणालाही विचारा ...

कुणी कोणाकडे जाईना

कुणी कुणाकडे येईना, 

जगलात काय मेलात काय 

माया कुणाला येईना ...

         संवेदनशीलता आता 

         फारशी कुठं दिसत नाही,  

         बैठकीत किंवा ओसरीवर 

         गप्पाची मैफिल बसत नाही ...

पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी 

इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,  

यातच हल्ली माणसाचा 

होत आहे The End ...

         Luxury मधे लोळतांना 

         फाटकं गाव नको वाटतं,  

         जवळचं नातं असलं तरी 

         सांगायलाही नको वाटतं ...

उच्च शिक्षित असूनही 

माणूस आज Mad वाटतं,  

इंटेरियर केलेल्या घरामधे 

लुगडं, धोतर Odd वाटतं..  

         सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे

         कसे काय Posh असतील?  

         पार्लर मधून आणल्या सारखे 

         चिकणे चोपडे कसे दिसतील? 

उन्हा तान्हात तळणारी 

माणसं काळी पडणारच,  

गरिबीनं गांजल्यावर 

चेहऱ्याचा रंग उडणारच ...

         कुरूप ते नाहीत 

         कुरूप तू झालास,  

         प्रेम नात्यावर करायचं सोडून

         दिसण्याला भुलून गेलास ..  

..

         पात्र कितीही मोठं झालं 

         तरी गंगेचं मूळ विसरू नये,  

         सुख असो का दुःख असो 

         आपल्या माणसाला विसरू नये.  

दिसण्यावर प्रेम करू नकोस 

आपलं समजून जवळ घे,  

एरव्ही नाही आलास तरी 

दिवाळीला तरी घरी ये..  

      कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास 

      माणसावर प्रेम करायचं शिक,  

      नाहीतर मानसिक आरोग्यासाठी 

      दारोदार मागत फिरशील भीक ...

दुसऱ्याचा  छळ करून 

तुम्ही सुखी होणार नाही,  

पॅकेज कितीही मोठं असू द्या 

जगण्यात मजा येणार नाही. .  

       जग जवळ करतांना 

       आपली माणसं तोडू नका,  

       अमृताच्या घड्याला 

       अविचाराने लाथाडू नका..!

​मी का बोलू?​

​मी का फोन करू?​

​मी का कमीपणा घेऊ?​

​मी का नमते घेऊ?​

​मी का नेहमी समजून घ्यायचं?​

​मी काय कमी आहे का?"​

असे बरेच सारे ​"मी"​ आहेत ,

जे आयुष्यात विष कालवतात ...

म्हणून , अरे अतिशिकलेल्या माणसा ​मी पणा​ सोड नि

नाती जोड़ .

Saturday, November 11, 2017

'माझी चळवळ'

बेवारीस पडलेल्या मृतदेहासारखी माझी अवस्था ,
आकाशातल्या गिधाडांची चोच माझ्या शरीराचे छीन्न-विछीन्न करत आहे,
रक्ताचा सडा पाण्याच्या विरुद्ध दिशेने जात असताना माझ्या लक्षात आल,
कि माजी चळवळ शांत असलेल्या समुद्राशी नसून तिच्या लाटांशी आहे."


"ढगांचा गड-गडाट आकाशाला फाडणारा विजेचा धसका,
समोरून येणारे जोरदार तुफान आणि,
जमिनीतून निघणारा गरम लावा,
माझा जीव घेण्यास अतोनात प्रयत्न करत आहे,
आता माझी जगण्याची इछाच मेली पण,
जगण्याची इच्छा नसताना माझ्या लक्षात आल कि,
माझी चळवळ जिवंत राहून संकटांना तोंड देण्याची आहे."


विंचूचा डंक शवाला भिडला आहे,
सापाच विष शरीरात गुरमळत आहे,
रक्त वाहण्या बंद होण्याच्या दिशेने आहे,
सर्व अवयवाना हलवणारा मेंदू स्तब्ध होईल,
मन अंगातल कण ना कण शोषून घेईन,
हात पाय गार पडतील,
आता शेवटचा श्वास मुग्ध घेऊन डोळे अंधाराकडे जातील,
तेवढ्यात अंधारातून जाताना एक काजवा दिसला,
अंधाराला आणि काळोखाला,
मिटवण्याच बळ जर त्याच्याकडे आहे,
तर हीच माझी चळवळ आहे.

Atul Kharat

पुरोगामी चळवळीतले लेखक

डावे, सेक्युलर व पुरोगामी चळवळीतले लेखक, कवी, आर्टीस्ट, फिल्म मेकर्स, जरनालिस्ट्स आदी लोकांचा एक सॉलिड क्लास असतो. त्यांचा एकूण अटायर, त्यांचे कपडे, आयग्लेअर्स, सॉल्ट-पेपर लुक्स दिलेले केस, मस्त फ्रेंच कट, अरमानी परफ्युम्सचा सुगंध, तोंडात सिगार आणि बोलताना हाय-फाय इंग्रजी. यांच्यासोबत संध्याकाळी ऑपेरा हाऊसमधे जॅझ ऐकत व उंची स्कॉचचा आस्वाद घेत जगभरातल्या साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, विज्ञान आदी विषयांवर मारलेल्या गप्पांमधे रंगण्यात एक वेगळीच मजा असते. येथे बुद्धीची मशागत होते. आपली विचारसरणी दुसऱ्यावर थोपवण्याचा अॅरोगन्स यांच्यात कुठेच नसतो. आपल्याही ज्ञानाची कसोटी लागते. उथळ व संदर्भहिन चर्चा येथे होत नाहीत.

याउलट, टोकाची उजवी विचारसरणी असलेले हिंदूत्ववादी, इस्लामिस्ट, संघी, मोदूभक्त, भाजपाई, ओवेसिस्ट, बजरंगी इत्यादि कॅटेगरीतले लोक हे टिपीकल 'गावठी' म्हणजे हिंदीत 'देहाती' टाईप असतात. हे जवळ आले तर यांच्या अंगाला शेणा-मुताचा किंवा चोरबाजारातून विकत घेतलेल्या उग्र घाणेरड्या अत्तराचा वास येतो. ड्रेसिंग सेन्सचा आणि यांचा काही संबंधच नसल्याने हे नाईट क्लब्समधेही पुजेला घालायचे कपडे व डोक्याला टिळा लाऊन पोचतात, परिणामी विनोदाचा विषय बनतात. इस्लामिस्ट तर यापेक्षाही भयानक असतात. यांच्या जोकरछाप मेंदी लावलेल्या दाढीमिशा, तोकडी सलवार, डोळ्यात सुरमा आणि तोंडात पान-गुटखा असल्या अवतारामुळे यांना तर बुद्धीजीवी दरवाजातूनच हाकलून देतात. संघी- मोदूभक्तांची तर बातच निराळी. प्रभातशाखेत बौद्धिक गोमुत्र प्राशन करून आल्यावर आपल्या धडावर दिलेल्या टाळक्याचा स्वतंत्र्य असा उपयोग करण्याची गरज नसल्याची यांची खात्री झाल्याने यांच्याशी वादविवाद करणे निरर्थकच असते. चर्चेत वेदातली विमाने, गणपतीची प्लास्टिक सर्जरी, पहिला टेस्टटूब बेबी कर्ण, महाभारतले अणुविज्ञान किंवा अगदीच हल्लीचा तेजोमहल आदी उदाहरणे घुसवून तुम्ही यांच्याबाबत बाळगत असलेला तुच्छतेचा भाव किती योग्यच आहे याची तुम्हाला जाणीव होत रहाते. बाह्या फाटलेला किंबहुना फाडलेला कुडता हे लोक मोदीस्टाईल म्हणुन मिरवतात यावरुनच यांची फॅशनेबल दिवाळखोरी दिसते. बजरंगी-टनाटनी आदि कॅरेक्टरमधे घुसलेली माकडं तर एक निराळंच प्रोडक्ट असतात. हे लोक बुद्धीजीवींसाठी अस्पृश्य का आहेत हे वेगळं सांगायला नकोच. संध्याकाळी एखाद्या देशीच्या गुत्याबाहेर उकडलेली अंडी विकत घेताना हे हमखास सापडतात. देशीच्या अंमलानुसार यांची देशभक्ती कमी-अधिक होत असते. युज अँड थ्रो म्हणून टिश्यूपेपरसारखा यांचा उपयोग होत असतो.
एकूण काय तर या सगळ्या प्राण्यांच्या सहवासात राहून तुमच्या राहणीमानात व बुद्धीच्या विकासात सकारात्मक बदल होण्याची काडीचीही शक्यता नसल्याने तुम्हाला आपण कुणाच्या बाजूने रहावयास हवे याचा बऱ्यापैकी अंदाज आता आलाच असेलच.
तर यापुढे आपली अक्कल लावा आणि आपला 'क्लास' ठरवा.

( देशहितमें जारी )

Tuesday, November 7, 2017

फेसबुक ..फेसबूक.

फेसबुक, व्हाट्स अॅप  आपल्याला मोफत सेवा कशी पुरवत असेल ? एक पैसाही आज पर्यंत आपण फेसबुकला दिला नाही.  व्हाट्स अॅप  मध्ये नेमकं काय आहे की फेसबुकने एकोणीस बिलियन डॉलरला ते विकत घ्यावं ?
एका फेसबुक युजर च्या मागे फेसबुक वर्षाला सातशे ते आठशे रूपये कमावतं, हे माहित आहे का ?  संपुर्ण जगभरात किती फेसबुक युजर असतील ?

एक हायवे आहे, रोज लाखो लोक ये जा करत असतात. रस्त्याच्या कडेला गाडीच्या जाहिरातीचं मोठे होर्डिंग आहे. जाहिरात बघून किती लोक ती गाडी घेण्याचे स्वप्न बघतील ? किती लोक ती गाडी घेण्याचा विचार करतील ? लाखो लोकामधले किती लोक ती गाडी खरेदी करतील ? एक टक्का ?  दोन टक्के ? मग या दोन टक्के लोकांसाठी कंपनीला लाखो लोक बघू शकतील अशी प्रचंड जाहिरात करावी लागतेय ? पण जर अशी जादू झाली की ज्याला ती गाडी घ्यायची आहे त्यालाच फक्त  ती जाहिरात दिसावी. इतर लोकांना त्यांच्या आवडीच्या वस्तूच्याच वेगवेगळ्या जाहिराती दिसाव्यात . कंपन्यांचं जाहिरातीवरचं किती काम वाचेल ना ? त्या वस्तूत स्वारस्य नसलेल्या व्यक्तिवर जाहिरातीचा करावयाचा वायफळ खर्चही वाचेल ना ? पण कंपन्यांनी असा जादूगर कुठून आणायचा ?

कंपन्यांना तो जादूगार सापडलाय !  फेसबुक. त्याचा साथीदार आहे व्हाटस अॅप . आपली एवढी माहिती फेसबुकला आहे, जेवढी आपल्यालाही नाही.  काम धंदा, वय, लिंग, आवड निवड, राहण्याचे ठीकाण. कुठे जन्मला, कुठल्या शाळेत गेला, काय शिकला, कुठे गेला ? काय खातो, काय पितो, विक पॉईंट कुठला ? स्ट्रॉंग बाजू कुठली, स्वभाव, विचार, फिरायला जाण्याची ठीकाणं , कधी कुठे फिरायला गेला होता, मित्र कोण, कसे आहेत ?  येवढी माहिती फेसबुकला आपणच तर  दिलेली असते, नंतर आपण त्यातली काही माहिती  विसरूनही गेलेलो असतो, काही माहिती आपण डिलीटही केलेली असते, फेसबुकवर मात्र प्रत्येकाचं संपुर्ण रेकॉर्ड सेव्ह असतं. व्हाटस अॅप  त्याला आपल्या मित्रांची सगळी  माहिती पुरवतं. येवढा मोठा डाटा बेस सद्ध्यातरी अणखी कुणाकडे नाही.

अॅमेझॉनवर तुम्ही एखाद्या वस्तूचा शोध जरी  घेतला तरी काही मिनिटातच  ती वस्तू तुम्हाला तुमच्या फेसबुक टाईम लाईनवर सतत दिसू लागते, सतत तुमचा पिच्छा पुरवते.  अॅमेझॉन फेसबुकला त्या व्यक्तिलाच फक्त ती जाहिरात दाखवण्याचे पैसे देत असतं, फेसबुक आपलं काम चोख करत राहतं.  फेसबुक अशा प्रकारे अनेक कंपन्यांकडून पैसे कमावत असतं. फेसबुक एका युजर मागे वर्षाला आठशे रूपये कमावतं ,आपण मात्र फेसबुकचा वेगळाच वापर करतो नाही का ?

जात, धर्म, राजकारण, गट, तट, पंथ, सगळे एकमेकांचे कट्टर दुश्मन झालेत. रोज एकमेकाच्या उरावर बसण्यासाठी आपण फेसबुकचा वापर करतो. आपआपले स्कोअर सेटल करत राहतो. फेसबुकवरून क्रांतीच्या बाता मारत राहतो. सरकार उलथवून लावण्याची भाषा करतो. सकारात्मक, नकारात्मक, वापर,  गैरवापर करत राहतो. आपल्यासाठी ते फ्री आहे ना !

कॉन्ट्रॅक्टस , मिडिया फाईल्स, आयडेन्टीटी, लोकेशन, सगळ्यात घूसण्याची आपणच फेसबुक ला परवानगी दिलेली असते. तुम्ही कुठे आहात ? तुमच्या मोबाईल मध्ये काय काय आहे ? सगळं फेसबुकला दिसंत असतं. तुमचं अकाउंट, मग ते फेक का असेना, तुमची खरी ओळख फेसबुक पासून दडून राहू शकत नाही. तीन गोष्टी तुमचे बॅंक अकाउंट रिकामे करू शकतात. तुम्ही बॅंकेसाठी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर, तुमचे पुर्ण नाव, तुमची जन्मतारीख, महिना, वर्ष. हॅकर्स साठी पुढचं सगळं सोपं असतं.

फेसबुक सुरक्षित आहे, पण तुमची प्रायव्हसी सुरक्षित नाही. फेसबुकला किती, आणि कोणती माहिती पुरवायची, याचा विचार करण्याची खरंच आज  गरज आहे. नोकरीसाठी मुलाखतीस जाणाऱ्या उमेदवाराच्या बायोडाटा पेक्षा, त्याचा फेसबुकवरचा डाटा महत्वाचा वाटतो नोकरी देणारांना.  त्यावरून त्याची नोकरी ठरते. म्हणून चांगल्यासाठीच फेसबुकचा वापर व्हायला हवा. नाहीतर प्रत्यक्षात तुम्ही कितीही सज्जन असा, फेसबुकवरची तुमची सोशल इमेजच जगात तुम्हाला ओळख निर्माण करून देणारी ठरणार आहे आता …..